नवी दिल्ली - दिल्लीलगतच्या राज्यांना टोल आकारणीतून मिळणाऱ्या महसुलात दिल्लीलाही वाटा मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आज केली. ""दिल्लीतील रस्ते व पार्किंगच्या सुविधेचा सर्वाधिक वापर उत्तर प्रदेश व हरियाना या राज्यांतून येणाऱ्या वाहनांसाठी होतो आणि टोल मात्र ही दोन राज्ये वसूल करतात,'' असेही त्या म्हणाल्या. हवामानबदलाविषयक आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.