उत्तर महाराष्ट्र >> बातम्या RSS

विद्यार्थ्यांनी घेतला 'एटीकेटी'चा लाभ - शिक्षणाधिकारी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 03rd, 2009 AT 11:11 PM
जळगाव - जिल्ह्यात शालान्त माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत (दहावी) दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या 1514 पैकी अवघ्या 105 विद्यार्थ्यांनी शासनाच्या निर्णयाचा लाभ घेऊन अकरावीत प्रवेश घेतला आहे. या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी शिबिर सोमवारपासून (ता. 9) सुरू होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी एस. के. वानखेडे यांनी दिली.

दहावी नापास विद्यार्थ्यांना 'एटीकेटी'द्वारे प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण मंडळाने घेतला आहे. यात चाललेल्या गोंधळामुळे जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांनी ऑक्‍टोबर परीक्षा देणे पसंत केले. त्यामुळे या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील 1514 पैकी 105 विद्यार्थ्यांनाच मिळू शकला आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मागे राहिलेला अभ्यासक्रम जादा तास घेऊन भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.

कागदपत्र पडताळणी शिबिराचा कार्यक्रम असा - 9 नोव्हेंबर - जळगाव, रावेर, यावल व भुसावळ. 10 नोव्हेंबर - जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा. 11 नोव्हेंबर - एरंडोल, भडगाव, धरणगाव, चाळीसगाव. 12 नोव्हेंबर - अमळनेर, चोपडा व पारोळा.

वाचकांच्या प्रतिक्रिया